Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत खालापूर विधानसभा तिकीटासाठी रस्सीखेच

आमदार महेंद्र थोरवे यांची तिकिटासाठी चोहोबाजूंनी कोंडी!!
शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला?

(निवडणूक विधानसभेची - संतोष दळवी)

अगदीच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत तिकिटासाठी सुरू झालेली संगीत खुर्ची संपायच नाव घेत नसल्याने हजार कोटीचा विकास पाण्यात जाऊ शकतो अशी विधाने महायुतीतील नेत्याकडून येत असल्याने विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभा तिकिटाचा प्रवास खडतर बनत चालला आहे.एकीकडे अजित पवार सांगतायत की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षातील लोकांना ती जागा सोडण्यात येईल मात्र  महायुतीला ज्या  जागेवर धोका आहे आणि त्या जागेवर महायुतीतील पक्षाचा प्रभाव अधिक आहे त्या पक्षाला ही जागा सोडण्यात येणार असल्याची कबुली चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.म्हणजे महायुतीत आलबेल आहे असं म्हणता येणार नाही.तशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघावर हक्क सांगितल्याने थोरवे यांचा तिकिटवरील पेच अजून वाढत आहे.माजी जिल्हा परिषद सभापती असलेल्या सुधाकर घारेंसाठी खुद्द प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे महायुतीत किल्ला लढवत असून ते जाहीररीत्या मिडीयाशी बोलत आहेत मात्र  शिंदे गटातील पालकमंत्री उदय सामंत आणि ज्यांचे खंदे समर्थक दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेआमदार महेंद्र थोरवे यांचा किल्ला लढवताना दिसून येत नाही .तसे करत असतील तर त्या बाबी मिडिया समोर येत नाहीत. किँवा रायगडाचे शिंदे गटाचे इतर आमदार थोरवेंच्या बाजूने बोलताना दिसत नाही त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे हे एकाकी पडल्याचे सध्या तरी चित्र आहे.

राष्ट्रवादीला उठसूठ अंगावर घेणे पडू शकत महागात

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभा वाद आहे.तो सर्वश्रुत आहे मात्र सरकार मध्ये है दोन्ही पक्ष बसल्याने जनतेला वाटल की हा वाद शमेल मात्र तो अधिकाधिक उफाळून येऊ लागला.आमदार महेंद्र थोरवे यांनी ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या वेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.मंत्री आदिती तटकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.याच गोष्टींचा विचार करता सुनील तटकरे हे कर्जत खालापूर विधानसभा जागेवर हक्क सांगत आहेत.तशात भाजपचा एक गट कर्जत खालापूर या जागेवर आग्रही आहे.कोकणात मंत्री रविंद्र चव्हाण म्हणतील तो उमदेवार दिला जाऊ शकतो .किरण ठाकरे यांना चव्हाण यांनी अनेक विकासकामे दिल्याने व विधानसभेची तयारी करण्याच्या दृष्टीने जोरदार पाठबळ दिल्याने कर्जतच्या जागेवर रायगडातील इतर सहा जागेपेक्षा सर्वच पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याने आमदार थोरवे यांना तिकीट मिळवणं अवघड असल्याचे बोलल जातंय.ज्या मित्र पक्षांची मदत घेऊन निवडणूक लढवायची आहे त्यांनाच अंगावर घेत आहेत.मित्र पक्षातील हनुमान पिंगळे यांना राष्ट्रवादीतून शिंदे गटात घेतल्याने तटकरे यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी कर्जत विधानसभेवर हक्क सांगायला सुरुवात केली आहे.कर्जत तालुक्यात सुधाकर घारे यांच्या रूपाने त्यांना मजबूत नेतृत्व मिळाले असल्याने घारे यांना नाराज करून राष्ट्रवादीची हानी करून घ्यायची नसल्याने व जुन्या नव्या राजकीय वादाची मोट बांधून तटकरे यांनी थोरवे यांच्या तिकिटाला अपशकून केला आहे.

शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला
आमदार महेंद्र थोरवे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. मातोश्री बरोबर घरोब्याचे संबंध गुंडाळून त्यांनी शिंदे यांना साथ दिली.  त्या बदल्यात थोरवे यांना अनेक विकास कामे करण्याची संधी दिली.आमदार थोरवे यांची जाहीररीत्या कोणी वरिष्ठ नेता बाजू घेताना दिसत नाही किंवा मीडियात कोणी बाजू घेताना दिसत नाही त्यामुळे कोण कोणाला तिकीट मिळवून देत यावर साऱ्या कर्जत खालापूरकरांचे लक्ष लागून राहिलं आहे.  कर्जतच्या या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे भारी भरतात की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भारी भरतात हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे.
    दरम्यान तिकीट मिळवण्यासाठी नमनालाच इतकं घडाभर तेल गेल्याने भले महायुतीतील कोणालाही तिकीट मिळाल्यास कोण कुणाचं काम करणार हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो.समेट घडवून आणण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ किती यशस्वी होतात हे येत्या काळात दिसेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies